ग्रामपंचायत चेंदवण ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
चेंदवण गाव उज्ज्वल भविष्य – सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाच्या वाटेवर!
आमच्याबद्दल अधिक वाचा











चेंदवण गाव उज्ज्वल भविष्य – सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाच्या वाटेवर!
आमच्याबद्दल अधिक वाचाग्रामपंचायत चेंदवण ही कुडाळ तालुक्यातील एक प्रगतिशील, समृद्ध आणि सातत्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. आमच्या गावाचा इतिहास, परंपरा, संस्कृती आणि लोकसहभाग हा आमचा खरा ठेवा आहे. ग्रामीण विकासाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या सुविधांचा लाभ पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.
चेंदवण गाव निसर्गरम्य परिसरात वसलेले असून हिरव्यागार वनराई, स्वच्छ वातावरण, शेतीप्रधान जीवनशैली आणि सांस्कृतिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे. गावातील लोकांमध्ये आपुलकी, सहकार्य, आणि एकमेकांविषयी आदर याची परंपरा अनेक पिढ्यांपासून जपली गेली आहे. गावाच्या प्रगतीत नागरिकांचा सहभाग नेहमीच महत्वाचा ठरला असून ग्रामसभा, विविध समित्या आणि उपक्रमांद्वारे लोकसहभाग वृद्धिंगत होत आहे.
ग्रामपंचायतीचे मुख्य ध्येय म्हणजे गावातील प्रत्येक नागरिकाचा सर्वांगीण विकास. पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, सार्वजनिक सुविधा, महिलांचे सबलीकरण, युवकांना रोजगार, आणि शेती विकास या सर्व क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायत सातत्याने काम करत आहे. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आम्ही प्रामाणिकपणे करतो.
आमची ग्रामपंचायत पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग, आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यावर विशेष लक्ष केंद्रित करते. डिजिटल युगात शासनसेवा प्रत्येक नागरिकाच्या बोटांच्या टोकावर पोहोचवणे ही आमची महत्त्वाकांक्षा आहे. ऑनलाईन सेवा, डिजिटल नोंदी, इलेक्ट्रॉनिक माहिती फलक, आणि वेबसाइटद्वारे आम्ही प्रशासन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि जनसुलभ केले आहे.
प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सुरक्षित वातावरण देणारे आत्मनिर्भर व समृद्ध उपळे मायणी गाव घडवणे.
गावातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार सुविधा देत, जबाबदार आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून सतत विकास साधणे.
दिनांक :-04/09/1956
(जनगणना -२०२४ नुसार)- 1723
858
865
443
1370
696.93.41 हेक्टेअर
350.50.92हेक्टेअर
35.30.5हेक्टेअर
4
2
1
01
34
06
21
5
1
गावातील नागरिकांच्या सोयीसाठी विविध शासकीय व सामाजिक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्या पूर्णपणे पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने दिल्या जातात.
जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांची ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया
घरकुल बांधकामासाठी प्रधानमंत्री आवास योजना व अन्य योजनांचे अर्ज केंद्र
लसीकरण व आरोग्य तपासणीसाठी सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र
नागरिकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी व घरगुती पाणी कनेक्शन सुविधा उपलब्ध
वीजपुरवठा सुधारण्यासाठी नवीन कनेक्शन तसेच तक्रारींसाठी जलद सेवा प्रणाली
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, मिड-डे मील योजना आणि विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध
वृद्ध, अपंग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी सामाजिक योजनांची सुविधा.
मालमत्ता कर व परवान्यांसाठी सोयीस्कर ऑनलाइन सेवा उपलब्ध.
केंद्र व राज्य सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना गावात प्रभावीपणे राबवून पात्र नागरिकांना त्यांचा पूर्ण लाभ मिळावा यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत.



ही योजना ग्रामीण भागातील बेघर व गरजू कुटुंबांना सन्मानाने राहता यावे म्हणून पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देते. घरात शौचालय, स्वयंपाकघर, वीज व पाण्याच्या सोयी पुरवल्या जातात.
मनरेगा ही ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू नागरिकाला वर्षात ठरावीक दिवसांचे रोजगार मिळण्याची हमी देणारी योजना असून, त्यामुळे आर्थिक स्वावलंबन, सामाजिक समता आणि गावांचा विकास साध्य होतो.
भारत सरकारद्वारे राबवली जाणारी स्वच्छ भारत मिशन योजना स्वच्छता टिकवून ठेवणे, घराघरात शौचालये बांधणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण करणे यावर लक्ष केंद्रित करते.
भारत सरकारची मिड डे मील योजना ग्रामीण व शहरी शाळांमधील मुलांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देऊन त्यांचे सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवते.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.